Monday, March 31, 2014

मीडिया के पक्षपात का भंडा फोड़ !!


आज का टॉपिक :-मीडिया के पक्षपात का भंडा फोड़ !!
साथियों जैसा की हम रोजाना देखते है कि बी.एस.पी के समाचार ये मिडिया बहुत कम देता है जो भी देता है उसमें भी इनका नेगिटीव पॉइंट होता है!!जबकि कोंग्रेस, बीजेपी,आप कि दिन भर जय जय कार करते रहते है!!आप कोई भी टीवी चेनल लगाकर देख् लीजिए कोई मोदी की बढ़ाई कोई केजरीवाल की कोई राहुल गाँधी की ..लेकिन आजतक बी.एस.पी ओर मायावती जी की कभी नही सुनी!!
अभी जैसा इलेक्शन का दौर है तो मीडिया प्रधानमन्त्री उमीद्वारो के बारे में दिखाता है उनके उमीद्वार है मोदी,केजरावाल,राहुल गाँधी उसके बाद कभी कबार गलती से मुलायम सिंह ओर कुछ दुसरे भी!!चलो मोदी उमीद्वार है राहुल गाँधी भी है लेकिन केजरीवाल क्यू है?
ऎसा केजरीवाल ने क्या कर दिया जो उसे इतना हीरो बना दिया गया है जबकि देश में तीसरे नंबर कि पार्टी बी.एस.पी का कही भी नामों निशान नही मीडिया में मायावती जी को पी.एम उमीद्वार बताने से भी इनको डर लगता है जबकि केजरीवाल जैसों को बताते है!!क्या केजरावाल ने बी.एस.पी से ज्यादा वोट इस देश में हासिल किए ज्यादा सीटें हासिल की क्या?केजरीवाल एक बार दिल्ली का सी.एम बना है जबकि बहन जी 4 बार उतर प्रदेश जेसे विशाल राज्य की सी.एम बनी है!!आप ने सिर्फ़ दिल्ली में सीटें हासिल कि है जबकि बी.एस.पी ने उतरप्रदेश,राजस्थान,मध्यप्रदेश,हरियाणा,छतिसगढ़,पंजाब,उतरांचल जेसे कई राज्यों में बी.एस.पी ने सीटें जीती है क्या वो कुछ नही है क्या केजरीवाल की दिल्ली कि सीटें बी.एस.पी की टोटल सीटों से ज्यादा है!!बहन जी ने 4 बार यु.पी को अच्छी सरकार ओर अच्छा प्रशासन दिया जबकि केजरीवाल ने सिर्फ़ 49 दिन नौटंकी की है दिल्ली कि सड़कों पर!!
इसका क्या कारण है कि केजरीवाल को हीरो बना दिया गया!!क्या वो मीडिया को प्यारा है या कोई ओर चक्कर है!!आप किसी भी न्यूज़ को उठाकर देख् लीजिए केजरीवाल मोदी राहुल के अलावा कोई नही..ओर उमीद्वारो कि लिस्ट भी सिर्फ़ इन तीनों पार्टियों की है बी.एस.पी को अन्य में रखते है जबकि केजरीवाल को हीरो बना दिया!! सर्वे में भी इन्हीं को जगह ..यु.पी जेसे एरिया में कोंग्रेस बिजेपी पिछले 22 सालों से तरस रही है वहा मिडिया मोदी कि लहर ओर केजरीवाल को स्पोर्ट करने कि बात कर रहा है इसका मतलब साफ़ है कि मीडिया कोंग्रेस बीजेपी ओर आप के अलावा इस देश में किसी कि सरकार नही चाहते है!!यु.पी में बसपा सपा पिछले 22 सालों से आगे है लेकिन मीडिया को आजतक नजर नही आए जबकि बीजेपी ओर केजरीवाल बढा जल्दी नजर आ गए!मीडिया वालों आपको इन तीनो पार्टियों को ही स्पोर्ट करना है तो सीधा करे हमे कोई दिक्कत नही पर ढोंग ना करे....एक बार करके देखे फिर बताते है की कैसे सबकी लहर ओर हवा गायब होती है!!मोदी की केजरीवाल की हर रेल्लि का लाइव टेलीकास्ट ओर अखबारों में मैन सुर्खियों में जबकि बी.एस.पी का एक छोटे से कोने चार लाइन की खबर वो भी अपने तरीके से!!
मिडिया के अभी मैंन दो हीरो चल रहे है मोदी,केजरीवाल ओर तीसरा राहुल गाँधी ..इनके अलावा किसी के लिए कोई जगह नही...
साथियों हमे अपना मीडिया ख़ुद बनना है..ओर ज्यादा से ज्यादा सीटें बी.एस.पी को दिलवाए संसद में भेजना है ओर इन सबको दिखाना है कि बी.एस.पी को नजर अंदाज़ करना मतलब क्या है ?साथियों घर घर जाकर बी.एस.पी कि विचारधारा फेलये ओर सभी समाजों धर्मो से अपील करे कि अपना कीमती वोट सिर्फ़ बसपा को दीजिये सबको देख् लिया अब एक बार हमको भी देख् लीजिए ऑप्शन है आपके पास बस चुनने की देरी है!!सो सभी धर्म,समाझाउआ से विनती है कि बी.एस.पी को वोट करे!!
के.के.सिंह गेंवा

विश्व इतिहास का सबसे बड़ा और सबसे लंबे समय तक चलने वाला घोटाला


भक्तों ने देवी-देवताओं के लिए जो माल चढ़ाया, अगर वह
देवी-देवताओं तक नहीं पहुंचा तो यह विश्व इतिहास का सबसे
बड़ा और सबसे लंबे समय तक चलने वाला घोटाला होगा.
पिछले 3500 सालों से लेकर आज की तारीख तक
का दुनिया का सबसे बड़ा घोटाला है: दान-दक्षिणा घोटाला.
भगवान का कहना है कि इतने सालों में हमारे द्वारा चढ़ाये गए
फल, दूध, चुनरी, नारियल, लंगोट, पैसा, चादर, गहने, सोना-
चांदी, तेल-तिल का दान तो क्या, एक
फूटी कौड़ी भी अभी तक उसके पास
नहीं पहुँची. भगवान
की स्थिति बहुत दयनीय है और उसने निर्णय लिया है
कि उसके नाम पर मंदिर के अंदर बैठकर उसकी दलाली और
कमीशन-एजेंटगिरीकरने वाले लोगों पर वो केस करेगा. मुझे
भगवान से पूरी सहानुभूति है.. प्रभु आप संघर्ष करो, हम
तुम्हारे साथ हैं !
जो लोग देवी देवाताओं में विश्वास रखते है, उनका यह
भी विश्वास है कि विश्व की निर्मिती देवी-देवाताओं ने
की है.
यानी धरती पर जो कुछ भी है उसे देवी-देवाताओं ने
बनाया है.
अगर यह सब चीजें देवी-देवाताओं ने ही मनुष्य और
प्राणी के लिए ही निस्वार्थ भाव से बनाया है,
तो भला मनुष्य देवी-देवाताओं की बनाई चीजें देवी-देवाताओं
को ही प्रसाद-भेंट के रूप में कैसे चढ़ा सकता है?
उन्हें उनकी बनाई हुई चीजें उन्हे ही वापस देकर उनसे अधिक
की मांग कैसे कर सकता है? जबकि उनके अनुसार इनमें से
एक भी चीज मनुष्य की पैदा की हुई नहीं है.
अजीब लॉजिक ह

Thursday, March 27, 2014

वाचा आपण कधीही न वाचलेला बाबासाहेबांचा इतिहास !!




वाचा आपण कधीही न वाचलेला बाबासाहेबांचा इतिहास !!

जगात आपलं नाव गिनिज बुकात नोंद व्हावे म्हणून कुणी-कुणी काय-काय उपद्व्याप केले आहेत होते हे आपण पाहतो ऐकतो.... पण जगाच्या पाठीवर ग्रथांसाठी (पुस्तकांसाठी) खास घर बाधंणारी एकच महान अशी व्यक्ती होवून गेली ती व्यक्ती म्हणजे विद्येचे व्यासंगी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर. डॉ. बाबासाहेबांच्या हिंदु क़ॉलनीतील राजगृह ह्या वास्तुतील ग्रंथसंग्रह पुढीलप्रमाणे...


कायदा या विषयावरील - ५०००

ग्रंथ राजकारण या विषयावरील - ३०००

ग्रंथ इतिहास या विषयावरील- २५०० ग्रंथ

धर्म या विषयावरील - २०००

ग्रंथ साहित्य याविषयावरील- १३००

ग्रंथ चरित्रे याविषयावरील- १२०० ग्रंथ

अर्थशास्त्र या विषयावरील- १२००

ग्रंथ तत्वज्ञान या विषयावरील- ६००

ग्रंथ युद्धशास्त्र याविषयावरील- ३००

ग्रंथ आणि इतर ग्रंथ ७९००

असे डॉ. बाबासाहेबांनी एकूण २५००० ग्रंथ वाचले. म्हणून अशा या महामानवाला प्रज्ञासुर्य, विद्येचे डॉक्टर, बोधिसत्व, प्रकांड पंडीत असे म्हणतात.

पंडित मदनमोहन मालवीय यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे असलेला आपण दाखविलेला हा ग्रंथसंग्रह दोन लाख [आताच्या हिशेबात वीस कोटी] रुपयांना विकत घ्यायची इच्छा व्यक्त केली होती. बाबासाहेबांनी ती अमान्य तर केलीच. परंतु, त्यावेळेला त्यांनी जे उत्तर दिले, ते त्यांच्यातील ज्ञान, तपस्वीपणाची साक्ष देणारे ठरले. ते म्हणाले ग्रंथसंग्रह जाणे म्हणजे माझ्या कुडीतून प्राण जाण्यासारखे आहे. ग्रंथ म्हणजे त्यांच्या जीवनाचा श्वासोच्छवास होता. हे त्यांनी जमवलेल्या ग्रंथावरुन सिध्द होते. हे सांगणे एवढ्यासाठीच महत्वाचे आहे की जीवनामध्ये त्यांनी ज्या तत्वज्ञानाचा अंगीकार केला त्याला केवढा मोठा भक्कम पाया या ग्रंथातून मिळाला होता हे लक्षात येते.

Monday, March 24, 2014

देव देवळात नसते. देवळात पुजाऱ्याचं पोट असते.....




एका गावात एक नवीन मंदिर बांधण्यात आले. त्यानिमित्त गाडगेबाबांना कीर्तनासाठी बोलावण्यात आले. कीर्तन असे झालेः

गाडगेबाबा - गावात मंदिर बांधलं वाटतं, नाही रे ?
लोक - हो जी.....
गाडगेबाबा - आता काय करान?
लोक - देव आणून बसपू जी....
गाडगेबाबा - देव आनान कुठून?
लोक - बाजारातून.....
गाडगेबाबा - बाप्पाए, बाजारातून? इकत का फुकट?
लोक - इकत....
गाडगेबाबा - बाप्पा, देव इकत भेटते? थो का मेथीची भाजी हाये का, कांदे-बटाटे होये बाजारात इकत भेटाले ? बरं आणला कत, मग काय करान ?
लोक - देवाची आंघोय करून देऊ जी....
गाडगेबाबा - बाप्पा तुमच्या देवाले सोताची आंघोय नाही घालता येत? वा रे तुमचा देव ! बरं, मग काय करान ?
लोक - त्याच्यासमोर निवद ठेवू आन् काठी घेऊन बसू दरवाज्यात
गाडगेबाबा - काहून?
लोक - एकादं कुत्रं येऊ नये आन् देवाच्या निवदाला खावू नये म्हणून जी.
गाडगेबाबा - बाप्पा तुमच्या देवाले सोताच्या निवदावरलं कुत्रं नाही हाकलता येत, थो तुमच्यावर आलेलं गंडांतर कसं दूर करंन रे? म्हणून म्हनते, "देव देवळात नसते. देवळात पुजाऱ्याचं पोट असते.....!!!"

Wednesday, March 19, 2014

जगातील एकुन बौध्द



जगाच्या पाठीवर इस्लाम आणिख्रिश्चन या दोन महाशक्ती आहेत.
या दोघाच्या युध्दात तिसरी शक्ती
निर्णायक ठरणार आहे.ती तिसरी
शक्ती म्हणजे बौध्द शक्ती.

जगातील एकुन बौध्द धर्मियां
पैकी ९८ टक्के लोक आशिया खंडात
राहतात.बौध्दाची लोकसंख्या जगभर
पसरली आहे.जगातील धार्मिक आधा-
रावरील लोकसंख्येच्या आधारे बौध्द
लोकसंख्या ४ था क्रमांक आहे. काही
निरीक्षकांच्या मते,हिंदु आणि बौध्दां-
ची लोकसंख्या एकञ केल्यास ती
लोकसंख्या दुस-या क्रमांकावर जाते.

जगातील पाचही खंडात बौध्द
धर्माचे अनुयायी आढळतात.यापैकी
बौध्द धर्मियांची जास्त लोकसंख्या
आशिया खंडात आहे.लोकसंख्येच्या
सारणीवरुन असे लक्षात येते की
जगातील सर्वात जास्त बौध्दाची लोक
संख्या ३९,१८,९४,१४३ असुन तिची
एकून लोकसंख्येशी टक्केवारी ३०
टक्के आहे.चीन,जपान,थायलंड,म्यान-
मार,दक्षिन कोरीया,मलेशिया या
देशात बौध्दधर्मीयांची संख्या जास्त
आहे.विशेषतःथायलंड,कंबोडीया,
मगोलिया आणि म्यानमार या देशात
९० टक्क्याहून अधिक लोकसंख्या
बौध्दांची आहे.

आशिया खंडातील अनेक देशा-
मध्ये बौध्द धर्माला अधिकृत शास-
किय धर्माचा दर्जा प्राप्त झाला आहे.
त्यामुळे त्या धर्माला शासनाचा पाठी-
बा देखील आहे.अलीकडे पाश्चिमात्य
देशातील बौध्दधर्मियांनी संख्या वाढत
असुन त्याच्याकडे वैज्ञानिक आणि
प्रगतीशील म्हणुन पाहीले जाते.अमेरी-
केसारख्या प्रगतीशील देशात बौध्दंची
लोकसंख्या ३० लक्ष आहे.

जगाच्या पाठीवरील देशांमध्ये
बौध्दांच्या लोकसंख्येशी ही स्थिती
असताना भारतात माञ निराशाजनक
स्थिती आहे. भारतात बौध्दधर्मियांची
संख्या एकून लोकसंख्येच्या,०.७टक्के
आहे.एकून बौध्दांची लोकसंख्या
असलेल्या देशाच्या तुलनेत भारताचा
१० वा क्रमांक आहे. जगातील काही
देशामध्ये ९० टक्क्याच्यावर लोकसं-
ख्या आहे आणि भारतात त्याचे प्रमाण
०.७ टक्के आहे याचा अर्थ अमेरीका
या देशाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात
बौध्दांची लोकसंख्या १ टक्के आहे.
अमेरीकेपेक्षाही भारतात बौध्दांची
टक्केवारी कमी असणे ही चिंतेची
बाब आहे.

जागतीक पातळीवर बौध्दांची
संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.जगात
बौध्दांची संख्या ७० कोटी असल्याचे
दाखवित असेल तरी प्रत्यक्षात ती
संख्या १ अब्ज ६० कोटी असल्याचे
म्हटले जाते याचा अर्थ ख्रिश्चनांच्या
लोकसंख्येनंतर दुस-या क्रमांकावर
बौध्दांचा क्रमांक लागतो.ख्रिश्चन आणि
मुस्लिम यांच्या तुलनेत बौध्दांची
संख्या वाढविणे हे जागतिक हिताचे
आहे.जगाला युध्दापासुन परावृत
करण्यासाठी बौध्दधम्माचा वृध्दिगत
आणि विस्तारीत करणे ,ही काळाची
गरज आहे

Wednesday, March 12, 2014

सरकारी शाळेत गणपती, सरस्वती, गजानन महाराज, येशू, अल्ला, किवा कोणत्याही धर्मीयांच्या देव-देवतांच्या फोटोचे काय काम??




सरकारी शाळेत गणपती, सरस्वती, गजानन महाराज, येशू, अल्ला, किवा कोणत्याही धर्मीयांच्या देव-देवतांच्या फोटोचे काय काम??


सरकारी शाळेत गणपती, सरस्वती, गजानन महाराज, येशू, अल्ला, किवा कोणत्याही धर्मीयांच्या देव-देवतांच्या फोटोचे काय काम?? आम्हा सत्यशोधक शिक्षकांच्या भावना यामुळे दुखवतात... धर्म ही वैयक्तिक बाब आहे. आमचा सरस्वतीला विरोध नाही मात्र सरस्वतीला शाळेत ठेवण्याला विरोध आहे.... सावित्रीमाईला न्याय मिळत नाही. तुमचे देव तुमच्या देव्हारयातच ठेवा.. शाळेत देशभक्ती शिकवा गुरुजी देवभक्ती नव्हे... धार्मिक व देवावरील विश्वास दृढ करणाऱ्या बोधकथा सांगून तुम्ही अतिरेकच करत आहात... अशा प्रवृत्तीचा जाहीर धिक्कार... सत्यशोधक शिक्षकांनी याचिका दाखल करून हा धार्मिक उन्माद थांबवला पाहिजे..


आम्ही भारतीय आहोत हो गुरुजी... आजचे गुरुजी त्यांचे स्वःतचे विचार(धार्मिक) मुलांमध्ये परिपाठातून रुजवतात.. श्लोक.. स्त्रोत.. प्रार्थना.. यापेक्षा तुकोबांचे अभंग.. तुकडोजी महाराजांची ग्रामगीता.. महात्मा फुलेंचे अखंड.. शालेय कविता पाढे यांचा परिपाठात समावेश केल्यामुळे मुले प्रगत होतील.. पण गुरुजी तुम्हाला नेमके हेच नको आहे.. मुले जास्तीत जास्त देवभोळे बनायला हवेतना.. पुरोगामी शिक्षक संघटना मुग गिळून गप्प आहेत.. आपण सर्वांनी जागृती करून या मंडळीना सवाल केला पाहिजे.. पावती फाडताना हा प्रश्न जरूर विचारा.. ही आपली सन्मानाची लढाई समजून.. सहकार्य करावे.. भारताचा कोणताही धर्म नाही.. आमचा तुमच्या धर्मालाही विरोध नाही.. पण शाळेतील देव-देवतेला विरोध आहे.. देवापेक्षा देश महत्वाचा.. शाळेत फक्त पुरोगामी व प्रगत शिक्षण दिले पाहिजे.. इत्तर गप्पा व्यर्थ.. जगातील प्रगत २०० विद्यापीठात एकही भारतीय विद्यापीठ नसल्यामुळे शिक्षणतज्ञ "सरस्वतीचा" सन्मान...?? करावा तेवढा कमीच आहे !!

Thursday, March 6, 2014

बुद्ध धम्म व भारतीय संविधान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत



MUST READ..!!!

बुद्ध धम्म व
भारतीय संविधान
एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत...

१५ ऑगस्ट १९४७ रोजी जगाच्या नकाशावर भारत नावाचा एक नवीन देश उदयास आला.
ज्या देशाचा एक प्राचीन इतिहास होता,
एक सम्बुद्ध संस्कृती होती,
एक स्वतंत्र अशी ओळख होती.
ती ओळख म्हणजे भारत हा बुद्धांचा देश.
जग भारताला ओळखते ते
भगवान बुद्धांचा देश म्हणून.
सम्राट अशोकाचा देश म्हणून.

परंतु हजारो वर्ष ही
ओळख झाकोळली गेली.
तिचे कारण--
कधी मुघलाचे राज्य
तर कधी इंग्रजांचे.
त्यामुळे हजारो वर्षे
या भूमीतून
बुद्ध संस्कृती लोप पावली.

परंतु
हजारो वर्षांच्या गुलामीविरूद्ध
प्रथमच संघटीत संघर्ष झाल्यामुळे

१५ ऑगस्ट १९४७ रोजी
देश स्वतंत्र झाला.
२६ जानेवारी,१९५० रोजी
देशाचे बारसे करण्यात आले.

भारतीय संविधानाच्या माध्यमातून,
बुद्धांच्या देशाला
सम्राट अशोकाच्या देशाला
नव्या रुपात
घटनेचे शिल्पकार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
जगासमोर मांडले.

भारताची जी ओळख
जगाला ठाऊक होती,
तीच ओळख
भारतीय संविधानाने
जगासमोर पुनर्स्थापित केली.

आपल्या देशाची संपूर्ण ओळख,
बुद्ध धम्माची ओळख झाली.
उदा...

*बुद्ध धम्माचे प्रतिक
आकाशी निळ्या रंगाला
राष्ट्रीय रंगाची मान्यता देण्यात आली,

*धम्माचे प्रतिक
कमळाचे फूल
आपले राष्ट्रीय फूल झाले,

*बोधीवृक्ष अर्थात पिंपळाच्या वृक्षाला
राष्ट्रीय वृक्षाची मान्यता मिळाली.

*बुद्धधम्माच्या धम्मचकाला
राष्ट्रीय चिन्ह घोषित करुन
राष्ट्रीय ध्वजावर अंकीत करण्यात
आले.

*सम्राट अशोकाची राजधानी सारनाथ
येथील चारसिंह ही राजमुद्रा,
भारताची राजमुद्रा घोषित झाली.

*समता, स्वातंत्र्य, न्याय व विश्व बंधुत्व हे बुद्ध धम्माचे तत्त्व
भारतीय संविधानाचे तत्त्व
म्हणून स्विकारण्यात आले,

*`सत्यमेव जयते' हे
सम्राट अशोकाचे घोषवाक्य,
भारतीय शासनव्यवस्थेचे
ब्रीद वाक्य म्हणून मानांकीत झाले.

एवढेच नाही तर
आपल्या देशाची प्रत्येक ओळख ही
बौद्ध संस्कृतीशी संबंधित झाली.

*आपल्या राष्ट्रीय ध्वज तिरंग्यातील
सर्वात पहिला रंग ज्याला आपण
लाल, केशरी, भगवा, लाल, नारंगी म्हणतो.
त्या रंगाला
भारतीय घटनेचे एका विशेष नावाने
वर्णित केले आहे.
इंग्रजीत त्याला
`ओशर' असे नाव आहे.
ओशर म्हणजे-
लालसर पिवळ्या मातीचा रंग,जो
बौद्ध भिक्षुंच्या चिवराचा रंग असतो.
चिवर हे बौद्ध भिक्षुंचे वस्त्र आहे.
जे त्यागाचे प्रतिक आहे.

*दुसरा रंग पांढरा
ज्या रंगाला बुद्ध धम्मात विशेष महत्त्व आहे.
पांढरा रंग हा शांती व सत्याचा प्रतिक म्हणून बौद्ध उपासक शील ग्रहण करताना पांढरे वस्त्र परिधान करतात.

*तिसरा रंग हिरवा जो
निसर्गावर, प्राणीमात्रावर प्रेम करण्याचा बुद्ध धम्माचा
पंचशीलेची शिकवण देणारा रंग


*तिरंग्याच्या मधोमध
बुद्ध धम्मतेचे प्रतिक
निळे धम्मचक आहे.
जे
सार्‍या विश्वाला
बुद्ध धम्माची ओळख देते.

असा सर्वांगीण बुद्ध
धम्माची प्रचिती देणारा
आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा,
राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
देशाला बहाल केला.

भारताच्या सर्वोच्च नागरीक पुरस्काराचे नावही
बुद्ध धम्माशी संबंधित आहे.

*`भारतरत्न'
रत्नही बुद्ध धर्माची पदवी.
बुद्ध, धम्म, संघ
म्हणजे बुद्ध धम्मातील त्रिरत्न.
बुद्ध धर्मात
सर्वश्रेष्ठ व्यक्तीला "रत्न "
ही पदवी बहाल केली जाते.
अनेक बौद्ध भिक्षूंच्या नावात
रत्न ह्या शब्दाचा उल्लेख असतो.
उद...भन्ते ज्योतीरत्न, भन्ते संघरत्न, भन्ते शांतीरत्न वगैरे.
रत्न ह्या महान शब्दाचा
बाबासाहेबांवर खूप प्रभाव होता.
बाबासाहेबांनी आपल्या एक
लाडक्या मुलाचे नावदेखील रत्न
शब्दांशी संबंधित राजरत्न ठेवले होते.
त्या रत्न महान शब्दावरुनच
देशाच्या सर्वोच्च नागरीक पुरस्काराचे
नाव भारतरत्न ठेवण्यात आले आहे.
त्या पुरस्काराचे
चिन्ह स्वरुप देखील
बुद्ध धम्माशी निगडीत आहे.
बोधीवृक्षाच्या पिंपळाचे सोनेरी पान,
ज्यावर
पुरस्कार स्विकारणाऱया व्यक्तीचे सोनेरी अक्षरात नाव कोरले जाते
व दुसऱया बाजूला
चार सिंह ही राजमुद्रा
व धम्मचक असते.

*बुद्ध धम्माचे
मैत्री, प्रेम व करुणेचे प्रतिक असलेल्या कमळाचे फुलाला
घटनाकारांनी राष्ट्रीय फुलाची मान्यता दिली.
थायलंड, श्रीलंका, बर्मा इ.
बौद्धराष्ट्रात भगवान बुद्धांच्या चरणी
कमळाचे फूल अर्पण करतात.

कमळाच्या फुलाला
पाली भाषेत `पदम' असे म्हणतात.

*भारतरत्न पुरस्काराच्या
खालोखाल तीन प्रमुख पुरस्कार आहेत,त्या पुरस्कारांची नावे
पद्म म्हणजे कमळाचे चिन्ह असते,
कमळाच्या एका बाजूस
पद्म व दुसऱया बाजूस
विभूषण, भूषण किंवा श्री
लिहिले असते.

*युद्ध शौर्यातील
तीन प्रमुख पुरस्कार
परमवीर चक व वीरचक
या पुरस्कारांवर देखील
कमळाचे फूल प्रामुख्याने असते.

*युद्ध शौर्यातील
प्रमुख पुरस्काराचे नाव
अशोक चक्र आहे.

*भारताच्या राष्ट्रपती भवनातील
प्रमुख दिवाणखान्याचे नाव
अशोक हॉल आहे.

*आपल्या केंद्रियमंत्री मंडळाच्या
निवासस्थान परीसराचे नाव देखील
बुद्ध संस्कृतीवर ठेवले आहे.
सम्राट अशोकाच्या
मंत्री मंडळाच्या नगरीचे नाव
जनपथ होते.
तेच जनपथ नाव आपल्या
केंद्रिय मंत्री निवास स्थानाचे आहे.
उदा... ७ जनपथ,१० जनपथ,११ जनपथ.

अशी
भारताची ओळख असणाऱया
प्रत्येक गोष्टीचा
बुद्ध धम्माशी संबंध आहे.
बुद्ध संस्कृतीशी नातं आहे.
घटना समितीच्या सदस्यांपैकी
प्रत्येकाने ती मान्य केली.
कारण ते सत्य आहे आणि
जे सत्य असते ते
कधीच अमान्य होऊ शकत नाही.

अशाप्रकारे बाबासाहेबांनी
सर्व भारत बौद्धमय केला.
हा

बुद्ध धम्माचा विजय.
सम्राट अशोकाचा विजय.
बोधीसत्व भारतरत्न
डॉ. बाबासाहेबांचा विजय.
हाच
भारतीय संविधानाचा विजय....
जय भीम.

Sunday, March 2, 2014

म. जोतीराव फुले, डॉ.बाबा साहब और बहेन मायावती


डॉ.बाबा साहब ने महात्मा जोतीराव फुले के बारे मे कहा था.भारत के सामाजिक क्रांती के पितामह.
महात्मा जोतीराव फुले का मृत्यू १८९१ को हुवा और डॉ.बाबा साहब का जन्म १८९१ को हुवा
महात्मा जोतीराव फुले कि मुहमेंट छत्रपती शाहूमहाराज ने आगे बढाई. छत्रपती शाहूमहाराजने डॉ.बाबा साहब को अपना उत्तरदाइत्व बनाया.और ये मुहमेंट डॉ.बाबा साहब के हातो सोपदी.
डॉ.बाबा साहब का मृत्यू १९५६ को हुवा और बहेन मायावती का जन्म १९५६ को हुवा.
बाबा साहब कि मुहमेंट जो महात्मा जोतीराव फुले ने सुरु करवाई थी.वही मुहमेंट छत्रपती शाहूमहाराजने आगे बढाई. वही मुहमेंट मान्य.काशीराम ने.आगे बढाई और बहेन मायावती को अपना उत्तरदाइत्व बनाया.डॉ.बाबा साहब अक्सर बोला करते थे आप लोगो मे से प्रधानमंत्री मुझे देखणा है और बहेन मायावती भारत कि प्रधानमंत्री बन सकती है. (महात्मा जोतीराव फुले को मृत्यू १८९१ को हुवा और डॉ.बाबा साहब जन्म १८९१ को हुवा. डॉ.बाबा साहब मृत्यू १९५६ को हुवा और बहेन मायावती जन्म १९५६ को हुवा.) बसपा को वोट देकर.कुदरत के साथ चलो.बहेन मायावती को भारत कि प्रधानमंत्री बनाओ.कुदरत हमे दोबारा मोका नही देगी.महात्मा जोतीराव फुले से लेकर बहेन मायावती तक हमे कुदरत ने मोका दिया है .

ठेवा ध्येय व्यवस्था परिवर्तनाचे, सत्ता परिवर्तनाचे नाही